अल्पवयीन बारावीच्या विद्यार्थिनीचा खून : कुडाळ हादरले!

Rajesh Palshetkar
0
कुडाळ (प्रतिनिधी): सावंतवाडी तालुक्यातील पावणे–वायंगणी परिसरात घडलेल्या एका क्रूर घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा तिच्याच वर्गमित्राने निर्दयीपणे खून केल्याचे उघड झाले आहे. 
विद्यार्थिनीचा खून

  घटना कशी घडली? २ ऑक्टोबर रोजी विद्यार्थिनी अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केली, मात्र ती सापडली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र गावातील एका विहिरीत तिचा मृतदेह आढळला आणि सर्वत्र धक्का बसला. 
  संशयित वर्गमित्र ताब्यात कुडाळ पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. संशयितावर लक्ष ठेवून चौकशी केली असता, तिच्याच वर्गातील कुणाल कुमार या अल्पवयीन विद्यार्थ्यानेच खून केल्याचे कबूल केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. आरोपीवर पुढील चौकशी सुरू असून, कठोर कारवाईची तयारी आहे. 
  पीडितेचे स्वप्न चुरले बारावीला शिकणारी ही विद्यार्थिनी पुढील शिक्षणाबाबत उत्सुक होती. पण क्षुल्लक कारणावरून तिचा जीव घेतल्याची घटना ऐकून परिसर हादरला आहे. या घटनेमुळे पालक, शाळा प्रशासन आणि स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. "विद्यार्थिनीला न्याय मिळावा आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी" अशी मागणी सर्वत्र होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top